राज्य सरकारने केल्या महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या !

मुंबई  : महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे दिसू लागताच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात मागील काळात भाजप सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर असलेल्या अधिका-यांचा समावेश आहे.  म्हाडाचे मुख्याधिकारी आणि उपाध्यक्ष असलेले मिलींद म्हैसकर यांची मंत्रालयात महसूल आणि वन विभागात प्रधानसचिव पदी बदली करण्यात आली आहे.

तर  अन्न आणि नागरी पुरवठा विभागात मंत्र्यांना न सांगताच परस्पर मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केल्याने वादग्रस्त ठरलेले संजय खंदारे यांना महाजनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. अन्य बदल्यांमध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदली मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव पदावर करण्यात आली आहे. तर नवी मुंबईत जलस्वराज्या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक असणारे  ए ए गुल्हाने यांची बदली चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी  के एच बगते यांची बदली शिरडी येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

Social Media