सुशांतसिह प्रकरणाचा तपास मार्गी लागेपर्यंत पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : भाजप नेते भातखळकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र. 

मुंबई,  :    केंद्र सरकारने सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही असा विश्वास आहे  त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल.मात्र हा तपास मार्गी लागेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांना सक्तिच्या रजेवर पाठवावे अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यानी केली आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्याना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ५०दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची भुमिका तसेच मुंबई शहराचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांचीही भुमिका हलगर्जीपणाची राहिली आहे. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत अशा प्रकारची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत कुठलीही लपवाछपवी करत नाही आहे याकरिता या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मुंबई शहर पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना हा तपास किमान विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यानी योग्य ते निर्णय घेतले नाहीत तर हे सर्व पोलिस प्रशासन सेवेतील अधिकारी आपण ही मागणी केंद्रीय गृहमंत्र्याकडे करू असा गर्भित इशारा देखील त्यानी पत्रात दिला आहे.

Social Media