सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त निःशब्द करणारे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आणि निःशब्द करणारे आहे. देशातील एका मोठ्या उद्यमशील घराण्यात जन्मून आपल्या कर्तव्य व कुशलतेने त्यांनी भारतीय उद्योग विश्वात आपला ठसा उमटवला होता. वडील पालनजी मिस्त्री यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांचे निधन व्हावे हा केवळ दैवदुर्विलास आहे.

त्यांच्या निधनाने उद्योग आसमंतातील एक तेजस्वी तारा निखळला आहे. या अतिशय दुःखद प्रसंगी मी दिवंगत सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Social Media