शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीतील बोरगाव झाडे चे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. सोलापूर मार्केट यार्डात, बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला, 512 किलो कांदा विकला. त्यांना किलोला १ रुपया दर देण्यात आला.

ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाईचा खर्च वजा करुन व्यापाऱ्यानं,च्या 10 पोती कांद्याला, २ रुपयांचा चेक दिला. ही शेतकऱ्यांची स्थिती आहे. (सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं ४ क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्याला १ रुपयाही मिळाला नाही. उलट खिशातून ३१८ रुपये द्यावे लागले.

Social Media