दोन ऑक्टोबरपासून देशभरात काँग्रेसची जनजागरण मोहीम

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्यानंतर च्या पन्नास वर्षाच्या काळात देशाला महासत्ता बनविण्याचे काम काँग्रेसने केल आहे .परंतु गेल्या आठ वर्षात भाजपच्या नेतृत्वाखाली देश पन्नास वर्षे मागे गेला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

काँग्रेसच्या उदयपूर येथील तीन दिवसीय चिंतन शिबिरात देशातील महागाई, बेरोजगारी, देशातील संविधान मूल्याची असुरक्षितता या विषयावर चिंतन करण्यात आलं. दोन ऑक्टोबरपासून देशभरात जनजागरण मोहीम काँग्रेस द्वारे केली जाणार असून देशाला गतवैभव मिळवून देणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची भूमिका स्वतःच्या सामर्थ्यावर लढण्याची आहे अशी माहिती सुद्धा पटोले यांनी दिली . या निवडणूकीत 50 टक्के तरुणांना उमेदवारी देण्याचे काटकोरपणे पालन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले .

Social Media