देशात कोरोना साथीच्या काळात 50,025 आयुष्मान भारत केंद्रे प्रचलित 

नवी दिल्ली : कोविड- 19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांपैकी 50,000 (50,025) पेक्षा जास्त आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी) देशभर काम करीत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, घराच्या जवळच्या समुदायांना प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) सेवा देण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2020 पर्यंत 1.5  लाख एबी-एचडब्ल्यूसी स्थापित केले जातील.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन म्हणाले, 50 हजाराहून अधिक केंद्रे उभारल्या गेले आहेत, तर त्यातील एक तृतीयांश लक्ष्य गाठले गेले आहे. यामुळे 25 कोटीहून अधिक लोकांना परवडणाऱ्या स्वस्त प्राथमिक आरोग्य सेवांना पोहचवण्यात सुधारणा झाली आहे. 678 जिल्ह्यांमध्ये 50,025  एबी-एचडब्ल्यूसी मध्ये 27,890 उप आरोग्य केंद्र कार्यरत आहेत, त्यात 3,599 शहरी  प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये एकूणच 28.10 कोटी लोकांना पाहिले गेले असून त्यापैकी 53 टक्क्याहून अधिक महिला आहेत.

6.43 कोटीहून अधिक उच्च रक्तदाब, मधुमेहासाठी 5.23 कोटी आणि कर्करोगाच्या तपासणीसाठी 6.14 कोटीहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. उच्च रक्तदाब उपचारासाठी जवळपास 1 कोटी लोकांना मोफत औषधे दिली जात आहेत आणि सुमारे 60 लाखांना मधुमेहाची औषधे दिली आहेत, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे.

हर्षवर्धन म्हणाले, केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, सर्व स्तरांवर देखरेख ठेवणे, कार्यपद्धतींचे मानकीकरण करणे, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नियुक्त केलेले काम आणि आरोग्य यंत्रणेच्या निर्मितीमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की कोविड-19 च्या व्यवस्थापनात एचडब्ल्यूसीनेही मदत केली आहे. केंद्र, योग, झुम्बा, कम्युनिटी वॉक, शिरोधार, ध्यान इत्यादी उपक्रमांसह 30 लाखाहून अधिक कल्याण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य आणि कल्याण केंद्रे (एचडब्ल्यूसी) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेवाय) जोडून आयुष्मान भारत  2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील झांगला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 रोजी प्रथम एबी-एचडब्ल्यूसी लाँच केले होते.

Social Media