सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी : छगन भुजबळ

मुंबई,नाशिक : टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांचे अपघाती निधन झाल्याची अतिशय धक्कादायक बातमी कळाली. अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, देशातील युवा उद्योजक सायरस मिस्त्री यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. अतिशय कमी वयात टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले. त्यांच्या निधनाने देशातील एक उमदा उद्योजक कायमचा हरपला असून उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Social Media