कोकणात अवकाळी पाऊस; आंबा, काजू, भात पिकाचे नुकसान …

रत्नागिरी(Ratnagiri) : जिल्ह्यात मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा(mango) तसेच काजू(Cashews) पिकाच्या मोहराची मोठ्या प्रमाणात गळती झाली. तर दुसरीकडे झोडणीला आलेले भात पीक भिजल्यामुळे ठीक ठिकाणी नुकसान झाले आहे.

आंबा तसेच काजू पिकावरील फवारणी वाया गेल्याने तसेच मोहर गळती झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने बागायदारांची चिंता वाढवली आहे. दरम्यान सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

Social Media