अमरावती जिल्ह्यात पावसाचा हाहाकार.. अनेक गावांशी संपर्क तुटला…

अमरावती : अमरावती(Amravati) जिल्ह्यात काल सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस धामणगाव रेल्वे तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यातील बोरगाव निस्ताने,सोनोरा काकडे,गोकुळसरा,दिघी महले या गावाबाहेर असलेल्या पुलावर पाणी असल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे.

महसूल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. याच दरम्यान नागापूर येथील बाबा दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय निबोली गावामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्यात. त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Social Media