नागपूर घटनेतील कोणाही समाजकंटकांना सोडणार नाही”…?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुंबई : Nagpur violence : नागपूर मध्ये मध्यरात्री जमावाने घडवलेल्या दंगलप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. “ही घटना पूर्णपणे पूर्वनियोजित वाटते.कारण ज्या मोबिनपुरा परिसरात नेहमी गाड्या असतात,तिथे काल कुठलीही गाडी नव्हती, यावरून हे स्पष्ट होतं,”अशी दाट शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली.

“जमावाने घरांवर हल्ले केले, जाळपोळ केली,मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही जणांना जीव वाचवावा लागला.पोलिसांवरही दगडफेक झाली, काहींवर कुऱ्हाडीने हल्ला झाला.अग्निशमन दलाच्या जवानांवरही हल्ला करण्यात आला.हे सगळं अत्यंत दुर्दैवी आहे,” असे सांगत,
“काही मंदिरांतील देवीदेवतांचे फोटोही जाळण्यात आले, ही अत्यंत गंभीर बाब आहे.त्यामुळे पोलिस मुळाशी जाऊन तपास करतील आणि दोषींना शोधून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. मात्र त्याचवेळी नागपूर हे शांतताप्रिय शहर असून समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव केला जात आहे.त्यामूळे सर्वांनी शांतता राखावी आणि सहकार्य करावं,” असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

औरंगजेबाच्या समर्थनावर टीका करत शिंदे म्हणाले, “औरंगजेब कोणाचा होतो? त्या आंदोलनकर्त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, ‘छावा’ पाहिला पाहिजे.औरंगजेबाच्या समर्थनाचा अर्थ सरळसरळ देशद्रोहच आहे.महाराष्ट्रासाठी औरंगजेबाची कबर ही कलंकच असून हा कलंक पुसला पाहिजे, ही लोकांची भावना आहे,” असल्याची संतप्त भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.त्याचवेळी विशिष्ट मतांसाठी जे बोलतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून थेट निलंबित केले पाहिजे असे सांगत त्यांनी सपाचे निलंबित आमदार अबू आझमी यांच्यावरही थेट निशाणा साधला.

“मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी,” असा इशाराही त्यांनी दिला.


महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट : प्रकाश आंबेडकर

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *