उत्तर प्रदेश : सर्प यज्ञ कुंडशाळेला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची तयारी सुरू….

रायबरेली : जनई गावातील सर्प यज्ञ कुंडशाळेला पर्यटनस्थळ (tourism) म्हणून विकसित करण्याची तयारी सुरू आहे. द्वापर (dwapar) काळापासून स्थापित असलेल्या या स्थळाचा इतिहास आणि लोकांची श्रद्धा पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. योजनेला अमलात आणण्याचे काम देखील सुरू झाले आहे. याच संदर्भात तहसील आणि पर्यटन विभागाच्या पथकाने जागेचा आढावा घेतला आहे.

गावात स्थापित असलेली ही यज्ञशाळा आणि त्याच्या जवळील मंदिराचा संबंध केवळ जनई गावापर्यंतच मर्यादीत नसून, आजूबाजूच्या इतर भागातील लोकांची देखील श्रद्धा आहे. आतापर्यंत गावातील लोक याची देखरेख करीत होते. चंदापूर राज घराण्याचे कौशलेंद्र सिंह यांच्या मागणीनुसार आता पर्यटन विभाग याला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची तयारी करीत आहे. यासाठी प्रादेशिक पर्यटन अधिकारी अनुपम श्रीवास्तव आणि तहसीलदार राम कुमार शुक्ला यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. ग्रामस्थांना असे आश्वासन दिले आहे की, लवकरच याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतरच सुशोभीकरणाचे काम सुरू होईल.

असे म्हणतात की, द्वापर युगात जेव्हा राजा परीक्षितला सापाने दंश केला होता, तेव्हा त्याचा मुलगा राजा जन्मेजयाने सर्व सापांचा नाश करण्यासाठी जनई गावात सर्पयज्ञ केले होते. त्यासाठी येथे मोठा तलाव (कुंड) बांधला होता. हे आता समुद्राच्या रूपात दिसत आहे. या प्रती लोकांची श्रद्धा पाहून औरंगजेबानेही येथे हल्ला केला होता आणि मंदिरातील स्थापित केलेल्या मूर्तींची तोडफोड केली होती. ही शिल्प अजूनही दृश्यमान आहेत. असे म्हटले जाते की जनई गावचे नावही जन्मेजय यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. दरवर्षी येथे कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते.
There is a preparation to develop Sarpa Yagya Kundshala in Janai village as a tourist destination.


कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प! –

पर्यटक न आल्याने उच्च हिमालय पडले ओसाड, कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प!

Social Media