गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बाजारपेठेतही उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची रेलचेल आहे. थंड पाण्यासाठी वापरले जाणारे, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, उन्हामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी ज्युस सेंटर, रसवंतीगृहांवर गर्दी होत आहे.
यातच गरिबांचा फ्रीज म्हणून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी येतात आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले हे माठ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. माठ हे माती, म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे.
आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातीलच पाणी पितात.
जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे…
माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन(Alkaline) शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात.
कोणतेही हानिकारक रसायने नाहीत बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.
नैसर्गिक थंडावा(Natural cooling).
लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.
मातीचे गुणधर्म.
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.
मेटॅबॉलिझम सुधारते(Improves metabolism).
माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.
उष्माघाताला आळा बसतो.
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.
घशासाठी चांगले असते.
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा.